९. मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय इयत्ता ७ वी 

१. योग्य पर्याय निवडा

(१) औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.

(अ) शाहजादा अकबर

(ब) छत्रपती संभाजी महाराज

(क) छत्रपती राजाराम महाराज

उत्तर :- छत्रपती संभाजी महाराज 

(२) बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे

(अ) संताजी व धनाजी

(ब) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण

(क) खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले

उत्तर :- (ब) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण

(३) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा

(अ) येसाजी कंक

(क) प्रल्हाद निळाजी

(ब) नेमाजी शिंदे

उत्तर :- (अ) येसाजी कंक

२. पाठात शोधून लिहा.

(१) संभाजी महाराजांना जंजिन्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले ?

उत्तर :- १) मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इ. स. १६८२ मध्ये सिद्दीविरुद्ध मोहीम उघडली

२) त्यांच्या ताब्यातील दंडाराजपुरी किल्याला वेढा घालून जंजिर्यावर तोफांचा भडिमार केला

३) परंतु , त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले , त्यामुळे संभाजी महाराजांना जन्जीर्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले .

(२) संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकविण्याचे का ठरविले ?

 

उत्तर :- १) गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्याविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत .

२) महाराजांच्या मृत्युनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले

३) पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाहाशी हातमिळवणी केली , म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले .

(३) राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ?

 

उत्त्तर :- राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी ताराबाई कडे सोपवली .

(४) महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे ?

 

उत्तर:- कवी देवदत्त यांनी जे काव्यात्म वर्णन केले आहे , त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे :

“राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकाली प्रमाणे कोपायमान झाली . त्यामुळे दिल्लीच्या बादशहाची – औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली , त्याचे तेज हरपले . भद्रकाली प्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रंरागीनीचे रूप धारण केले : म्हणून मुघालांनो , आता स्वतःला सांभाळा.

३. का ते लिहा.

(१) औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला.

 

उत्तर :- १) मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला पण

२) संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही . त्यामुळे त्याने हि मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला .

(२) संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.

 

उत्तर:- १) औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दय पाने ठार केले

२) मराठ्यांच्या या छात्रापतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले

३) त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले .

(३) महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.

 

उत्तर :- १) संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने झुल्फिकारखानाला रायगडला पाठवले

२) झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा दिया त्यावेळी गडावर राजाराम महाराज , त्यांच्या पत्नी ताराबाई , संभाजी महाराजान्च्च्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते

३) या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते

४) राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसुबीच्या नैतृत्वाखाली रायगड लढवावा , असे धोरण ठरवण्यात आले .